Pages

Showing posts with label अटक. Show all posts
Showing posts with label अटक. Show all posts

Friday, 11 May 2012

चिमुकलीला पळविण्याच्या बेतात असलेल्या तरूणीस अटक

भरवस्तीतील घटनेने घाटंजीत खळबळ
शेकडो लोकांनी केला तरूणीचा पाठलाग



पाच वर्षांच्या चिमुकलीस पळवुन नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरूणीला नागरिकांनी शिताफिने पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. घाटंजीतील नेहरूनगर भागात सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 
अश्विनी विठ्ठल गायकवाड (२३) रा.मांडवा ता.घाटंजी असे अटक करण्यात आलेल्या तरूणीचे नाव आहे. आज सकाळी ११ वाजेदरम्यान नेहरूनगर भागातील सुमारे पाच वर्षांची चिमुकली घरी न आढळल्याने तिच्या कुटूंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. तेवढ्यात मुलीच्या आजीला ती एका अनोळखी तरूणीजवळ दिसली. म्हातारी आपल्याकडे येत असल्याचे दिसताच सदर तरूणीने मुलीला घेऊन तिथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वृद्धेने तरूणीचा पाठलाग करून तिला गाठले. मुलगी बेपत्ता असल्याची वार्ता परिसरात वा-यासारखी पसरल्याने अनेक नागरिक घराबाहेर आले होते. त्यामुळे शेकडो लोकांच्या जमावाने त्या तरूणीस घेरले व तिच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली. यावेळी जमाव संतप्त झाला होता.  त्यानंतर पोलीसांना सुचना देण्यात आली. घाटंजी पोलीसांनी सदर तरूणीस ताब्यात घेऊन तिला ‘मायापाखर’ सुधारगृहात रवाना केल्याची माहिती आहे. ही तरूणी गुन्हेगारी प्रवृत्तीची असुन यापुर्वीही तिला काही ठिकाणी चोरी करतांना नागरीकांनी पकडून दिल्याचे यावेळी काही नागरिकांनी सांगीतले.
पोलीसांनी या प्रकरणात कसुन चौकशी करून यामागे मुले पळविणारी टोळी तर नाही ना याबाबत तपास करावा अशी मागणी होत आहे.


कुलरचा शॉक लागुन नवविवाहितेचा मृत्यू

तालुक्यातील पांढुर्णा (बु.) येथे दिपाली नितिन देठे (२३) या नवविवाहीतेचा कुलरचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी १०.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. विजेचा झटका लागल्यावर उपचारासाठी यवतमाळ येथे नेतेवेळी रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. सुमारे एक महिन्यापुर्वीच दिपाली हिचे गावातीलच नितिन देठे याचेशी लग्न झाले होते. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 

Friday, 13 April 2012

मोहदा येथे व-हाडाच्या वाहनाला अपघात: १ ठार; १२ जखमी


घाटंजी तालुक्यालगत असलेल्या मोहदा ता. पांढरकवडा येथे लग्न वरातीच्या वाहनाला आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर १२ व-हाडी जखमी झाले. मोहदा येथुन लग्न आटोपुन निघालेले मॅक्स पिक अप हे वाहन मोहद्यापासुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आसोली गावाजवळ उलटले. त्यामुळे या वाहनात बसुन असलेले शिवलाल रायसिंग राठोड (४०) रा. कारेगाव यावली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या सुमारे १२ व-हाड्यांना यवतमाळ येथे भरती करण्यात आले असुन त्यापैकी गंभिर जखमी असलेल्या चौघांना सेवाग्राम येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. जखमींमध्ये पवन ठाकुर पवार (२७), विक्रम मधुकर पवार (१५), रूपेश राजु जाधव (१०), गुलाब जांभुळकर (२४), वाल्मीक ढोबळे (१६), जयश्री राजु जाधव (१२), दुर्गा राजु जाधव (३५), नरेश चांदेकर (३५) संदिप पवार (३२), राजु वासुदेव जाधव (२७), संतोष नेवारे (३५) यांचा समावेश आहे. कारेगाव तांडा येथिल गजानन रामदास राठोड याचे मोहदा येथिल दामु जाधव यांच्या मुलीशी लग्न होते. लग्न आटोपून परता जातेवेळी हा अपघात घडला. 


दोन लाखांची अफरातफर करणा-या आरोपींना  मध्यप्रदेशातून अटक

येथिल बिर्ला जिनिंग मध्ये कापसाच्या वजनकाट्यात खोडतोड करून जिनिंग मालकाला तब्बल १ लाख ८६ हजार रूपयांनी गंडा घालणा-या दोन आरोपींना मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून अटक करण्यात आली. काल (दि.१२) च्या मध्यरात्री घाटंजी पोलीसांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी हितेष उर्फ रितेष राजु राठोड (२२) रा.शेगाव जि.खरगोन मध्यप्रदेश व रविराज मधुसूदन पवार (२२) रा.बंजर ता.भिकनगाव जि.खरगोन मध्यप्रदेश या आरोपींना रात्रीच घाटंजी येथे आणण्यात आले. सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरूनूले यांचे नेतृत्वात पोलीस कर्मचारी उमेश चंदन व सारंग बालपांडे यांनी ही कार्यवाही केली. फिर्यादी गोपाल रूडमल मित्तल यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीसांनी आरोपींविरूद्ध कलम ४०६, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
साभार :- देशोन्नती