वारकरी संप्रदायातील काकड आरतीची परंपरा
घाटंजी तालुक्यातील ग्रामीण भागात आजही तितक्याच
आपुलकी व श्रद्धेने जोपासल्या जाते.
महिनाभर भल्या पहाटे गावातुन
काकड आरती काढ़ण्यात येते.
कोजागीरी पौर्णिमा ते कार्तीक पौर्णीमा पर्यंत
गुलाबी थंडीत निघणा-या काकड आरतीने
गावातील वातावरण मंगलमय होऊन जाते.
काकड आरती समाप्तीच्या दिवशी संपुर्ण गावात
रस्त्यावर रांगोळ्या व फुलांनी सजावट केली जाते.
घरोघरी काकड आरतीत सहभागी लोकांचे
पाय धुवून त्यांची पुजा व स्वागत केले जाते.
आजच्या आधुनिक काळातही
मांगल्याची उधळण करणारी ही परंपरा
घाटंजी तालुक्यात श्रद्धेने जोपासल्या जाते.
अशाच काकड आरती समाप्तीच्या दिवशीची
खापरी (ता.घाटंजी) या गावची काही छायाचित्रे
घाटंजी न्युजच्या वाचकांसाठी.....!
(छाया:- अमोल राऊत, पांडुरंग निवल)











