Pages

Showing posts with label अभियान. Show all posts
Showing posts with label अभियान. Show all posts

Friday, 18 January 2013

सायतखर्डा येथे दारूबंदी अभियानास सुरूवात



तालुक्यातील सायतखर्डा येथे दारूबंदी अभियानाची सुरूवात करण्यात आली. गावातील संपुर्ण महिलावर्ग व तांटामुक्त गाव समितीच्या वतीने नुकतेच या विषयावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावात संपुर्णपणे दारूबंदी करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गजानन शेंडे होते. सामाजीक कार्यकर्ते मधुकर निस्ताने व मोरेश्वर वातिले यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले. दारूबंदी अभियान गावात राबविण्यासाठी पं.स.उपसभापती सुवर्णा निकोडे, पोलीस पाटील प्रभाकर देशमुख, गावातील सर्व महिला बचत गट, ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, गावातील तरूण वर्ग, भजनी मंडळे व प्रतिष्ठीत नागरिकांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष गजानन लेनगुरे यांनी केले. तर संचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र गोबाडे यांनी केले. 
साभार :- देशोन्नती 

Thursday, 26 January 2012

भयमुक्त निवडणुकांसाठी जनजागृती अभियान

वाढत्या तक्रारींमुळे आयोगाचे पाऊल
राष्ट्रीय मतदार दिनापासून सुरूवात
निवडणुकीत उमेदवारांकडून देण्यात येणा-या प्रलोभनांना बळी न पडता नि:पक्ष मतदान व्हावे यासाठी निवडणुक आयोग जनजागृती अभियान राबविणार आहे. २५ जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनापासुन एक आठवडाभर स्थानिक सामाजीक संघटनांच्या मदतीने मतदार जागृती अभियान राबविण्यात यावे असे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पैसे व दारूचा वापर होऊ नये, तसेच मतदारांमध्ये मतदानाच्या महत्वाची जाणीव निर्माण व्हावी हा या अभियानाचा उद्देश आहे. त्यासाठी राज्य निवडणुक आयोगाने मतदारांच्या जागृतीसाठी सीडी तयार केली आहे. ती स्थानिक केबल टि.व्ही.वर प्रसारीत करण्यात येणार आहे. शिवाय मतदारांना आवाहन करणारे फलक सुद्धा लावण्यात येतील. आगामी निवडणुकांमध्ये विवीध प्रलोभनांचा वापर करून सर्रासपणे मतदारांवर दबाव आणण्याचे प्रयत्न उमेदवार व राजकीय पक्षांकडून होत असल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुका भयमुक्त व स्वच्छ वातावरणात पार पाडण्याच्या दुष्टीने एक सकारात्मक संदेश जनतेत पोहचावा यासाठी आयोगाने हे पाऊल उचलल्याचे या आदेशात म्हटले आहे.
साभार :- देशोन्नती