Pages

Showing posts with label सोयाबीन. Show all posts
Showing posts with label सोयाबीन. Show all posts

Friday, 25 November 2011

आकपुरीत शेतक-यांनी काढली शासनाची अंत्ययात्रा


खापरी नाक्यावर तिन तास वाहतुक ठप्प




तालुक्यात शिवसेना व भाजपाच्या वतीने कापसाच्या प्रश्नावर करण्यात आलेल्या औपचारीक आंदोलनानंतर ख-या अर्थाने शेतकरी आज स्वयंस्फुर्तीने रस्त्यावर उतरला. यवतमाळ घाटंजी रस्त्यावर आकपुरी व खापरी येथे शेतक-यांनी रस्ता अडवुन कापसाला ६ हजार व सोयाबीनला ३ हजार रूपये हमीभाव देण्याची मागणी केली. खापरी नाक्यावर बैलगाड्या उभ्या करून रस्ता अडविण्यात आला होता.
त्यामुळे घाटंजी यवतमाळ रस्त्यावरील वाहतुक तब्बल तिन ते चार तास ठप्प झाली होती. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बॅनर शिवाय या आंदोलनात अनेक शेतकरी सहभागी झाले होते. खापरी येथिल आंदोलनाचे नेतृत्व प्रमोद नित, सुरेश बेले, राजु वातीले, मधुकर भोयर, विनोद उल्हे, शशांक साठे, राजु चौधरी, विलास भोयर, मनोज गोपने, अरविंद चौधरी, दिलीप सिडाम यांनी केले. घाटंजीचे निवासी नायब तहसिलदार एस.व्ही.भरडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  घाटंजी लगत असलेल्या आकपुरी येथेही हजारो संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले होते. ठिकठिकाणी दगड, काटेरी झुडूपे रस्त्यावर टाकुन वाहतुक थांबवीली होती. त्यामुळे यवतमाळकडे जाणा-या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गावातील लहान मुलेही घोषणा देत रस्त्यावर आली होती. शेतक-यांनी राज्य व केंद्र शासन तसेच राजकीय नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढुन भडाग्नी दिला. यवतमाळचे तहसिलदार वाय.आर.खान यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात जयवंत भोयर, मधुकर निस्ताने, अभिमान चाफेकर, लक्ष्मण आडे, सुनिल चौधरी, योगेश खरात, आशिष नलगे, मोहन जळके, गजानन आत्राम, विजय डहाके, विलास अवचित, विजय अवचित, विलास ढाले, ज्ञानेश्वर चौधरी, अनिल लांडगे, रवि दोरगे यांनी केले.