Pages

Showing posts with label सावित्रीबाई फुले. Show all posts
Showing posts with label सावित्रीबाई फुले. Show all posts

Wednesday, 9 January 2013

माळी समाज उपवर वधु परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद



अ.भा.माळी महासंघ तालुका घाटंजीच्या वतीने आयोजीत जिल्हास्तरीय माळी समाज सर्वशाखेय उपवर वधु परिचय मेळाव्याला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यवतमाळ जिल्ह्यातील विवीध भागांसह नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहुर तालुक्यातूनही अनेक उपवर वधु व त्यांचे पालक मेळाव्यासाठी आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अ.भा.माळी महासंघाचे विदर्भ मार्गदर्शक ज्ञानेश्वर गोबरे यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाडोळे होते. तसेच कार्याध्यक्ष मधुकर उडाखे, पं.स.उपसभापती सुवर्णा निकोडे, ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, उत्तम खंदारे, आत्माराम जाधव, डॉ.हेमंत म्हात्रे, वसंत निरपासे, झिबल वाढई, प्रा.काशिनाथ लाहोरे, गजानन चौधरी, रामभाऊ किरणापुरे, दत्ता सोनुले, श्री.बेलसरे, दिपक वाघ, अविनाश घाटे, कार्तिक शेंडे, राम भेंडारे, राजेश निकोडे, वासुदेव गुरनूले, संदिप चौधरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.
उपवर वधु परिचय मेळावे तसेच सामुहिक विवाह मेळावे ही काळाची गरज झाली असुन त्यामुळे सर्वांचाच वेळ व पैसा वाचतो. शिवाय समाज या निमित्ताने संघटीत होत असल्याने एकोप्याची भावना निर्माण होते असा एकमुखी विचार मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. ईतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी सामाजीक जनजागृती व्हायला पाहिजे. समाजाला आज महात्मा ज्योतीबा फुलेच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले.
मानोली येथे विहिरीत पडून मृत्यू पावलेल्या तिन बालकांना सर्व सभागृहाने दोन मिनिटांचे मौन पाळुन श्रद्धांजली अर्पण केली. तसेच राष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये निवड झालेल्या अतुल गजानन शेंडे याचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान माळी समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. सुभाष मोहुर्ले व भाग्यश्री लेनगुरे यांनी परिचय देऊन कार्यक्रमाची सुरूवात केली. यानंतर अनेक उपवर वधु तसेच त्यांच्या पालकांनी परिचय दिला. कार्यक्रमात नोंदणी झालेल्या उपवर वधुंची यादी सोयरीक या पुस्तक रूपाने प्रकाशीत करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष पांडूरंग निकोडे व संचालन अशोक मोहुर्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ.भा.माळी महासंघाचे झोलबाजी लेनगुरे, श्रीराम बोरूले, रमेश वाडगुरे, चंद्रभान चौधरी, रामकृष्ण सोनुले, देवानंद गाऊत्रे, भारत वाडगुरे, मनोहर वाडगुरे, गजानन लेनगुरे, बंडू निकोडे, संतोष सोनुले, संजय ठाकरे, विठ्ठल चौधरी, किसन गाऊत्रे, नरसिंग गुरनूले, गणेश मोहुर्ले, अजाब लेनगुरे, संतोष गुरनूले, चंद्रभान शेंडे, पुंडलिक वाढई, मोहन कोटरंगे, नागोराव लेनगुरे, मनोहर चौधरी, गुणवंत लेनगुरे, दिगांबर चौधरी, संजय ठाकरे, संतोष मोहुर्ले, रविंद्र शेंडे, पुरूषोत्तम गाऊत्रे, तेजस प्रधान, नामदेव चौधरी, रामेश्वर आदे, दत्ता मोहुर्ले, वासुदेव कावडे, किसन बोरूले, अतुल पेटकुले, शंकर लेनगुरे, प्रविण गुरनूले, रमेश वाडगुरे, प्रकाश मोहुर्ले, सदाशिव ठाकरे यांनी परिश्रम घेतले. 
साभार :- देशोन्नती 

Friday, 28 December 2012

घाटंजी येथे जिल्हास्तरीय माळी समाज वधु वर परिचय मेळावा


सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी भव्य आयोजन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्याने अ.भा.माळी महासंघ तालुका घाटंजीच्या वतीने जिल्हास्तरीय सर्वशाखेय माळी समाज उपवर वधु व पालक परिचय मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि.६ जानेवारीला सकाळी ११ वाजता संत मारोती महाराज सांस्कृतिक भवन घाटंजी येथे हा मेळावा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र महाडोळे राहतील. उद्घाटन ज्ञानेश्वर गोबरे यांचे हस्ते होईल. यावेळी घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, सा.बां.विभागाचे उपविभागीय अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, न.प.यवतमाळच्या बांधकाम सभापती माधुरी अराठे, म.ज्योतीबा दिनबंधु कल्याण मंडळाचे अध्यक्ष अशोक तिखे, अ.भा.माळी महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर उडाखे, उपाध्यक्ष वसंत निरपासे, झिबल वाढई, जिल्हा प्रवक्ता काशिनाथ लाहोरे, घाटंजी पं.स.उपसभापती सुवर्णा निकोडे, उत्तम खंदारे, सावतामाळी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष आत्माराम जाधव, अ.भा.महिला माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष माया गोबरे, गजानन चौधरी, रामभाऊ किरणापुरे, दत्ता सोनुले, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विवीध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. स्वागत समितीमध्ये अविनाश घाटे, राजेंद्र घाटे, शैलेश हुड, प्रदिप चोपडे, कार्तीक शेंडे, राम भेंडारे, गजानन अनखुळे, निमंत्रक व आयोजन समिती मध्ये पांडूरंग निकोडे, झोलबाजी लेनगुरे, रामकृष्ण सोनुले, गजानन लेनगुरे, रमेश वाडगुरे, भारत वाडगुरे, बंडू निकोडे, चंद्रभान चौधरी, मनोहर वाडगुरे, सदाशिव ठाकरे, श्रीराम बोरूले, देवानंद गाऊत्रे, संजय ठाकरे, गणेश मोहुर्ले, पुंडलिक वाढई, विठ्ठल चौधरी, अजाब लेनगुरे, मोहन कोटरंगे, किसन गाऊत्रे, संतोष गुरनुले, नागोराव लेनगुरे, संतोष सोनुले, नरसिंग गुरनुले, चंद्रभान शेंडे, मनोहर चौधरी यांचा समावेश आहे. तालुक्यातील सर्व ग्रामशाखेचे पदाधिकारी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व माळी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन अ.भा.माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे निमंत्रक पांडूरंग निकोडे यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती