Pages

Showing posts with label सर्वोच्च भारतीय. Show all posts
Showing posts with label सर्वोच्च भारतीय. Show all posts

Thursday, 28 June 2012

सर्वोच्च भारतीय निवडण्याची जनमत चाचणी रद्द करा

आंबेडकरी युवा मंचाची मागणी

सी.एन.एन. आय.बी.एन. व हिस्ट्री १८ या वाहिन्यांवर १९४७ नंतर महात्मा गांधी यांच्या नंतरचे सर्वोच्च भारतीय ही जनमत चाचणी घेण्यात येत आहे. एका राष्ट्रीय व्यक्तीमत्वाची आधीच सर्वोच्च ठरवून नंतर इतर व्यक्तीमत्वांची निवड करण्याची ही दोषपुर्ण जनमत चाचणी रद्द करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन येथिल आंबेडकरी युवा मंचच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले. असा प्रकार जगात प्रथमच होत आहे. यामुळे इतर महापुरूषांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत. या प्रकारामुळे सामाजीक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या चाचणीमुळे समाजात अनावश्यक वैचारीक संघर्षाला खतपाणी घातल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या जनमत चाचणीवर तातडीने निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे.