Pages

Showing posts with label शेतकरी विरोधी धोरण. Show all posts
Showing posts with label शेतकरी विरोधी धोरण. Show all posts

Wednesday, 30 November 2011

कापुस भाववाढीसाठी घाटंजी बंदला प्रतिसाद

 
कापसाला ६ हजार रूपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी घाटंजी तालुक्यात आंदोलनांचे सत्र अजुनही सुरूच असुन शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ घाटंजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. व्यापारी वर्गाने या बंदला सकारात्मक प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. रसिकाश्रयचे महेश पवार यांचे नेतृत्वात शेतकरी व युवकांनी शहरात फिरून बंद ठेवण्याचे आवाहन केले. शालेय प्रतिष्ठाने व वाहतुक सुरू होती.
तालुक्यातील साखरा येथे भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजयुमोचे तालुका अध्यक्ष राजु शुक्ला, सरचिटणीस गणेश चव्हाण, यांचेसह प्रदिप राठोड, अशोक राठोड, रामलाल पवार, साधुलाल चव्हाण, मोतीलाल चव्हाण, दिनेश चव्हाण, बंडु जाधव, उल्हास जाधव, विष्णु दंडाजे, निशेल राठोड, दिनेश पवार, अरविंद जाधव, चंद्रकांत राठोड, सुनिल राठोड, संदिप चव्हाण, शिवलाल पवार, हरसिंग जाधव, लाला राठोड, नितीन राठोड, रिंकु नगराळे, विजय डंभारे, अरविंद राठोड, कैलास चौधरी, राहुल खांडरे, तणव वाघ, विशाल भोंग, स्वप्निल मंगळे, विशाल कदम यांनी सहभाग घेतला.