Pages

Showing posts with label चारोळी. Show all posts
Showing posts with label चारोळी. Show all posts

Sunday, 29 April 2012

अनंत बावने यांच्या ‘विरंगुळा’ चारोळी संग्रहाचे प्रकाशन


येथिल कवी अनंत बावने यांच्या विरंगुळा या चारोळी संग्रहाचे प्रकाशन नुकतेच नागपुर येथे आयोजीत राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलनात करण्यात आले. महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन व श्री गुरूदेव युवा संगठण गुरूकुंज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरूदेव सेवाश्रम नागपुर येथे आयोजीत या संमेलनाचे निमंत्रक प्रा. ज्ञानेश वाकुडकर, कवी संमेलनाचे अध्यक्ष लोकनाथ यशवंत, कवी रमेश ठाकरे यांच्या हस्ते अनंत बावने यांच्या ११४ चारोळ्या असलेल्या ‘विरंगुळा’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या शब्द साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी भुषविले. उद्घाटन जेष्ठ साहित्यीक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले तर स्वागताध्यक्ष विष्णु मनोहर हे होते. घाटंजी येथिल कवी अनंत बावने यांचे यापुर्वी ३ काव्यसंग्रह प्रकाशीत झाले असुन रंग जिवनाचे हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
साभार :- देशोन्नती