Pages

Saturday 13 April 2013

प्रथमच झालेल्या गारपीटीत घाटंजी शहर काश्मिरमय




गेल्या अर्धशतकाहूनही अधिक कालावधीमध्ये घाटंजी शहरात जी नैसर्गिक घटना झाली नव्हती ती आज घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. आज चक्क १५ ते २० मिनिट आवळ्याच्या आकारापेक्षाही मोठ्या गारांचा वर्षाव झाल्याने परिसर पांढरा शुभ्र झाला होता. काही वेळासाठी शहराला जणुकाही काश्मिरचेच स्वरूप प्राप्त झाले होते. बराच वेळ सोसाट्याच्या वा-यासह टपो-या गारा पडायला सुरूवात झाली. तेव्हा सर्वत्र एकच धावपळ उडाली. सायंकाळी ४ वाजेपासुनच अवकाळी पावसाचे वातावरण होते. मात्र अचानकच गारा पडायला लागल्याने हे काय घडत आहे असाच प्रश्न सर्वांना पडला. कारण घाटंजी शहरात कधीच गारपीट होत नाही असा आजवरचा ईतिहास आहे. जुने लोक सांगतात की, आम्ही आतापर्यंत कधी शहरात गारपीट झाल्याचे पाहिले नाही. ब-याच काळापुर्वी एकदा शहरात झालेल्या गारपीटीने प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर एका संताने गार ‘बांधुन’ ठेवली होती असा समज शहरात आहे. त्यानंतर कधीही गारपीट झाली नाही असे सांगितल्या जाते. मात्र आज झालेल्या अभुतपुर्व घटनेने चर्चेला पेव फुटले आहे. उल्लेखनिय म्हणजे तालुक्याच्या ईतर भागात आज गारपीट झाल्याचे वृत्त नाही. या प्रचंड गारपीटीमुळे शहराच्या परिसरातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment