Pages

Tuesday 14 May 2013

राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळाला हात लावाल तर खबरदार !

घाटंजीतील गुरूदेवभक्तांचा ईशारा

गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणात प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाला हात लावल्यास त्याचे परिणाम शासन व प्रशासनाला भोगावे लागतील असा खणखणीत ईशारा घाटंजी तालुक्यातील गुरूदेव भक्तांनी दिला. तालुका प्रचारक अनंत कटकोजवार यांचे नेतृत्वात तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. अवघ्या विश्वाला एकात्मतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी लाखो गुरूदेवभक्तांसाठी प्रेरणास्थान आहे. 
अन्य पर्याय उपलब्ध असतांना महासमाधी परिसराचा भाग अधिग्रहीत करण्याचा शासन व प्रशासनाचा हट्टाग्रह अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली. ज्या गोष्टींच्या प्रबोधनासाठी शासन आज कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे ते प्रबोधन राष्ट्रसंतानी अनेक वर्षांपुर्वीच सुरू केले होते. त्या प्रबोधनाचा वारसा संपुर्ण देशात पसरलेले गुरूदेव भक्त करीत आहेत. असे असतांना त्यांच्या भावनांना जाणिवपुर्वक दुखावण्याचा प्रयत्न शासनाला महागात पडेल. महासमाधी परिसराचा भाग अधिग्रहीत न करता उपलब्ध असलेल्या पर्यायाचा विचार करावा अन्यथा गुरूदेवभक्त तिव्र आंदोलन छेडतील असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी तालुका सेवाधिकारी सुभाष देवळे, गुरूदेव सेवा मंडळाचे तालुका सचिव अरूण मानकर, शिवदास सोयाम, राजु विरदंडे, जगताप दादा, काळे दादा, शंकर शेंडे, दादाराव वानखडे यांचेसह अनेक गुरूदेवप्रेमी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment