Pages

Friday 31 January 2014

स्नेहसंमेलनात फ्री स्टाईल बाईक रायडींगचा थरार

रस्ता सुरक्षेचा संदेश : युवकांनो फाजिल धैर्य दाखवू नका



येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलना दरम्यान फ्री स्टाईल बाईक रायडींगने युवकांच्या मनाचा ठाव घेतला. राष्ट्रीय रेसर राहुल राठोड व दिलशाद खान यांचे चित्तथरारक बाईक स्टंट्स यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. 
हिलचेयर व्हिली, सुसाईड बर्नाऊट, सिट स्टॅण्ड व्हिली, रोलींग बर्नाऊट यासह विवीध प्रकारचे स्टंट्स युवकांना भुरळ पाडीत होते. मात्र या बाईकर्सनी युवकांना बाईकवर फाजिल धैर्य न दाखविण्याचे आवाहन केले. रस्त्यावर मर्यादीत वेगातच बाईक चालवावी. योग्य प्रशिक्षण असल्याशिवाय स्टंट्स करू नये. रस्ता हा सुरक्षीतपणे वाहने चालविण्यासाठी असतो स्टंट्स करण्यासाठी नाही असा संदेशही त्यांनी महाविद्यालयीन युवकांना दिला. या कार्यक्रमातून गोळा झालेला निधी यवतमाळ येथिल वृद्धाश्रमाला देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयाचे विद्यार्थी अमित पडलवार, सुहास दिवुंâडवार, निलेश दुल्लरवार, अनुप तारक, पुष्कर कुरजेकर यांनी पुढाकार घेतला. दरम्यान या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात विवीध खेळ व क्रिडा स्पर्धा, रांगोळी, थाळी सजावट, वादविवाद, वक्तृत्व, भावगित, कविता वाचन, आनंद मेळावा, पुष्परचना या स्पर्धांसह विवीध सांस्कुतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये विद्याथ्र्यांनी उत्स्पुâर्त सहभाग घेतला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे संचालक आर.यु.गिरी, आलिया शहेजाद यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती. स्नेहसंमेलनाचे प्रभारी म्हणुन प्रा.टी.एम.कोटक यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले. 
साभार : सकाळ 

Sunday 19 January 2014

महिला वाहक म्हणते, ‘बस मे चढोंगे तो जुते से मारूंगी’

सौजन्याचे धिंडवडे : बिघडलेल्या एस.टी.बसच्या 
प्रवाशांना बसविण्यास नकार
एस.टी.बसमधील वाहकाने प्रवाशांना विनम्र होऊन हात जोडून नमस्कार करावा, स्वत:चे नाव सांगुन त्यांचे स्वागत करावे आणि बस पेâरीबाबत माहिती द्यावी अशा सौजन्यपुर्ण वागणुकीच्या अभियानाला गेल्या एक जानेवारीपासुन सुरूवात झाली. मात्र काल (ता.१७) ला यवतमाळ घाटंजी मार्गावरील प्रवाशांना एका महिला वाहकाने दिलेल्या वागणुकीने हेच का ते एस.टी.चे ‘सौजन्य’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्या महिला वाहकाच्या अपमानास्पद वागणुकीची तक्रार काही प्रवाशांनी घाटंजी बसस्थानकात नोंदविली आहे.
याबाबत माहिती अशी की, काल (ता.१७) ला सकाळी १० वाजेदरम्यान यवतमाळ ते घाटंजी बस क्रं. एम.एच.०७ सी.७७७३ ‘यशवंती’ हि बस यवतमाळ शहरापासुन सुमारे ४ किमी अंतरावर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. या बसमध्ये वाहक नसल्याने चालकाने प्रवाशांनाच यवतमाळ आगारात मोबाईलद्वारे सुचना देण्यास सांगितली. बस बिघडल्यास त्याच मार्गावरील दुस-या एखाद्या बसमध्ये बसण्याची प्रवाशांना मुभा असते. मात्र त्या दरम्यान तिन बस थांबल्या नाही. तब्बल दोन तास ताटकळत बसल्यावर दुपारी १२ च्या दरम्यान एम.एच.०७-९४३७ क्रमांकाची बस प्रवाशांनी प्रयत्न करून थांबविली. मात्र या बसची महिला वाहक प्रवाशांना बसु देण्यास तयार नव्हती. बसचा वाहक सांगत नाही तोवर बसु देणार नाही असे ती म्हणाली. मात्र या बसला वाहक नसतो, हि बस नॉन स्टॉप आहे, आमचेकडे तिकीट आहे ते तपासा व आम्हाला बसु द्या अशी विनंती प्रवाशांनी केली. मात्र त्या महिला वाहकाने प्रवाशांशी हुज्जत घातली. यावर तुमच्या वरिष्ठांना विचारा, आम्ही आगारात फोन केला होता असेही प्रवाशांनी सांगितले. मात्र मला कुणाशीच देणेघेणे नसल्याचे ती म्हणाली. प्रवाशांची बसजवळ गर्दी झाली असता, ‘कोई बस मे चढा तो जुते से मारूंगी’ असे म्हणत तिने दरवाजा लावुन घेतला व बस निघुन गेली. त्यानंतर ब-याच वेळाने प्रवाशी अन्य एका बसने घाटंजीला पोहचले. 
महिला वाहकाच्या या अपमानास्पद वागणुकीची लेखी तक्रार प्रवाशांनी घाटंजी बस स्थानकात केली. तसेच विभाग नियंत्रक व वरिष्ठांकडेही तक्रार करणार असल्याचे प्रविण दोंतुलवार, विवेक गोहाडे, राजु जाधव, तानाजी नैताम, ऊवंâडा मेश्राम, सुनिता जाधव, मिना दोंतुलवार, मिलिंद गजभिये या प्रवाशांनी ‘सकाळ’ ला सांगितले. सदर महिला वाहक नेहमीच प्रवाशांशी उद्धट बोलते व वरिष्ठांनाही जुमानत नाही असेही काही प्रवाशी म्हणाले. एकीकडे एस.टी.महामंडळ सौजन्यपुर्ण सेवेचा गाजावाजा करीत असतांना अशी घटना या अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अशा बेलगाम कर्मचा-यांना आधी शिस्तीत आणावे व नंतरच सौजन्याचा विचार करावा असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. त्या महिला वाहकावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे.
साभार : सकाळ 

Tuesday 14 January 2014

जातीधर्मापेक्षा देश महत्वाचा - रामदास आठवले

आवाहन : देशहितासाठी महायुतीला सत्ता द्या !
कोणत्याही जातीधर्मापेक्षा देश महत्वाचा असतो. कॉंग्रेसने गेल्या सहा दशकात देशाचे वाटोळे केले आहे. दीन दलित, शेतकरी व शोषीतांच्या नावावर सत्ता उपभोगुन त्यांचेसाठी काहीही केले नाही. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रिपाई-भाजप-शिवसेना व स्वाभिमानी संघटनेच्या महायुतीला सत्ता द्या असे आवाहन रिपाईचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी केले. घाटंजी येथे आयोजीत महायुतीच्या मेळाव्यात ते उद्घाटक म्हणुन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार हंसराज अहिर होते. रिपाई (आ)चे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, भाजप जिल्हाध्यक्ष राजु डांगे, रिपाईचे सुधाकर तायडे, मोहन भोयर, बाबासाहेब गाडे, सेना उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकुर, विजय कोटेचा, उद्धव येरमे यांचेसह भाजप, रिपाई व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आठवले यांनी आपल्या खसखस पिकविणा-या भाषणातून कॉंग्रेसप्रणीत वेंâद्र व राज्य सरकारचा खरपुस समाचार घेतला. भगवा आणी निळा एकत्र आल्याने कॉंग्रेसच्या पोटात गोळा आल्याचे ते म्हणाले. रिपब्लिकन पक्षाला केवळ विशिष्ट समाजापुरता मर्यादीत न ठेवता सर्वांपर्यंत नेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकत्र्यांना केले. काहीही झाले तरी हातातला निळा झेंडा व जयभिमचा विचार सोडणार नाही. कॉंग्रेसने दलितांना केवळ सत्तेसाठी वापरले. सन्मान दिला नाही. त्यामुळेच भाजप सेनेशी सन्मानाची महायुती केल्याचे त्यांनी सांगितले. सिंचनासाठी पाणी अडविण्यापेक्षा आघाडी सरकारने पैसा अडवा पैसा जिरवा हाच उपक्रम राबविल्याची टिका त्यांनी केली. 
खासदार हंसराज अहिर यांनी अध्यक्षीय भाषणातून कॉंग्रेसच्या धोरणांचा समाचार घेतला. आघाडी सरकारवर लोकांचा विश्वास नाही, कॉंग्रेसने लोकांना कधीच आपलं मानलं नाही. केवळ महात्मा गांधीच्या नावाने मतांची लुट केली. हि लुट थांबविण्यासाठीच महायुती अस्तित्वात आल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. राज्याला विमानतळांपेक्षा धरणांची जास्त गरज आहे. विदर्भापेक्षा लहान असलेल्या पंजाब हरियाणामध्ये ९६ टक्के सिंचन होते. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्यात सिंचन परिषदेत येऊन पर्यटनासाठी १० कोटींचा निधी जाहिर करतात. शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या अंगावर सोयाबिन पेâकतो तरी या सरकारला शेतक-यांचे दु:ख कळत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. आधी कोळसा घोटाळा झालाच नसल्याचा कांगावा करणा-या सरकारने अखेर सर्वोच्च न्यायालयात गैरव्यवहाराची कबुली दिल्याने पंतप्रधानांसह या विरोधात बोलणा-या मंत्र्यांचा खोटारडेपणा जनतेपुढे आल्याचे ते म्हणाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून आघाडी सरकारच्या धोरणांवर टिका करून महायुतीला सत्तेत आणण्याचे आवाहन केले. दरम्यान, रामदास आठवले यांची व्यासपीठावर लाडूतुला करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप जिल्हाध्यक्ष राजु डांगे यांनी केले. संचालन सुरेश जाधव तर आभार प्रदर्शन संतोष जिवने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे जेष्ठ नेते मधुसूदन चोपडे, तालुकाध्यक्ष दत्ता कोंडेकर, शहराध्यक्ष विष्णु नामपेल्लीवार, सरचिटणीस देवानंद काळे, गिरीधर राठोड, तालुका कोषाध्यक्ष राजु सुचक, भाजयुमो तालुकाध्यक्ष गुड्डू शुक्ला, यांचेसह रिपाई (आ), भाजपा, शिवसेना व स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकत्र्यांनी परिश्रम घेतले.
साभार : सकाळ