Pages

Sunday 28 December 2014

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांचे आमदार राजू तोडसाम यांचेकडून सांत्वन


तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची भेट घेऊन आमदार राजू तोडसाम यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच शासन शेतक-यांच्या पाठिशी असुन त्यांनी असा धीर सोडू नये असे आवाहन केले. दरम्यान त्यांनी सायतखर्डा व सायफळ येथिल शेतक-यांना शासनाकडून मिळणा-या मदतीचे धनादेश प्रदान केले. 
घाटंजी तालुका हा आदिवासी शेतकरी बहुल असुन गेल्या तिन चार वर्षापासुन कधी अवर्षण तर कधी महापुर अशा नैसर्गिक संकटांमुळे तालुक्यातील शेतक-यांचे कंबरडे  मोडले आहे. त्यामुळे हतबल झालेला शतकरी प्रसंगी आत्महत्येचा मार्ग अवलंबीत आहे. शेतकरी वर्गाला आधार देऊन शासन त्यांच्या पाठिशी आहे याबाबत खात्री देण्यासाठी आमदार राजु तोडसाम यांनी तालुक्यातील आमडी, सायतखर्डा, सायफळ, घोटी शारी, व अंजी (नु) या गावच्या शेतकरी कुटूंबाच्या घरी जाऊन त्यांचेशी संवाद साधला. 
यावेळी घाटंजी तहसिलचे नायब तहसिलदार विलास बोलपिल्लेवार, मनोज कटनकर, उपसभापती रमेश धुर्वे, स्वप्निल मंगळे, अशोक यमसनवार, राजु शुक्ला, अंकुश हर्षे, सतिश भरडे, प्रणव वाघ, चेतन राठोड, सुरज जाधव, राहुल जांभुळे, किशोर घाटोळ, संजय मंगळे उपस्थित होते.

घाटंजीत 'व्यसनमुक्त थर्टीफ़र्स्ट' चा संकल्प

सामाजीक संस्थांचा पुढाकार : मार्गदर्शन कार्यशाळा व प्रचार रॅली
अलीकडच्या काळात पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून नववर्षाचे स्वागत करण्याची विभत्स प्रथा पडली आहे. नविन पिढीला या पासुन परावृत्त करण्यासाठी तालुक्यातील काही सामाजीक संस्थांनी पुढाकार घेतला असुन व्यसनमुक्त थर्टीफ़र्स्ट साजरा करण्याचा संकल्प घेतला आहे. या अंतर्गत ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता दिलासा संस्थेच्या कार्यालयात कार्यशाळा घेण्यात येणार असुन दुपारी साडेचार वाजतापासुन घाटंजी शहरातून पथनाट्यासह जनजागरण रॅली काढण्यात येईल. गिलानी महाविद्यालयापासुन रॅलीला सुरूवात होईल. दरम्यान संपुर्ण शहरात या माध्यमातून जनजागरण करण्यात येईल. 
अनेक युवक नवर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मद्यपान करतात. त्यामुळे अनेकांना त्याचे व्यसन लागते. अनेक युवक दारू पिऊन या दिवशी शहरातील रस्त्यांवरून भरधाव वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा प्रचंड त्रास होतो. 
युवकांमध्ये याबाबत जाणिव निर्माण होऊन युवाशक्तीचा योग्य उपयोग व्हावा या उद्देशाने प्राऊटिस्ट ब्लॉक, दिलासा सामाजीक संस्था, विकासगंगा संस्था, स्वरजिवन संस्था, प्रियदर्शीनी संस्था, प्रदिप बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांनी व्यसनमुक्त थर्टीफ़र्स्ट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तालुक्यातील युवकांनी या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वक्तृत्व स्पर्धेत वैभव पांगूळ प्रथम, प्रणाली तोंडरे द्वितीय

स्वच्छता मित्र करंडकात समर्थ विद्यालयाचे सुयश
स्थानिक शि.प्र.मं.गिलानी महाविद्यालयात झालेल्या स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत श्री समर्थ कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. समर्थ कनिष्ठ विजान महाविद्यालयातील विद्यार्थी वैभव गजानन पांगूळ याने पहिला क्रमांक पटकावून पाच हजार रूपयांचे बक्षिस मिळवीले तर प्रणाली वामन तोंडरे हिने द्वितीय क्रमांक मिळवीत तिन हजार रूपयांचे रोख पारितोषीक पटकावले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापीका विमल मानकर, उपमुख्याध्यापक मिलिंद काळे, पर्यवेक्षीका नंदिनी ठाकुर यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत समर्थ विद्यालय द्वितीय

तालुक्यातील श्री गजानन महाराज अ.जा.प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, तिवसाळा येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये येथिल श्री समर्थ विद्यालयाच्या प्रयोगाने द्वितीय क्रमांक पटकावला. समाजस्वास्थ्यासाठी गणित व विज्ञान या मुख्य विषयांतर्गत कचरा व्यवस्थापन यावर आधारित ’थिंक ग्लोबली अ‍ॅक्ट लोकली’ हा प्रयोग साकारण्यात आला होता. हा प्रयोग माध्यमिक गटातील सिद्धी मांडवगडे व प्रतिक्षा शास्त्री यांनी साकारला. त्यांना श्रीमती नगरे व तिवारी यांचे मार्गदर्शन मिळाले. 
तिवसाळा येथे झालेल्या समारंभात समर्थ विद्यालयातील शिष्यवृत्ती प्राप्त वेदांत शेवतकर, शिवम कुडमते, उर्मिला मेश्राम, यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाचे मुख्याध्यापीका विमल मानकर, उपमुख्याध्यापक मिलिंद काळे, पर्यवेक्षीका नंदिनी ठाकुर यांचेसह शिक्षकवृंद व कर्मचा-यांनी कौतुक केले.

Thursday 25 December 2014

घाटंजीत चिमुकल्यांनी उधळले कल्पनांचे रंग

सकाळ बामित्र चित्रकला स्पर्धेला अभुतपुर्व प्रतिसाद







पहाटेची गुलाबी थंडी...निसर्गरम्य परिसरात विवीध विषयांवरील कल्पनांना कागदावर रेखाटण्यात तल्लीन झालेली मुले...बालमनाची निरागसता मुलांनी काढलेल्या चित्रातून प्रतिबिंबीत होत होती. अशा वैविद्यपुर्ण वातावरणात झालेल्या सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धेला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. 
घाटंजी शहरातील सर्व शाळेतील विद्याथ्र्यांनी स्पर्धेत उत्स्पुâर्त सहभाग घेतला. येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयात हि स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेदरम्यान घाटंजी न्यायालयाचे न्यायमुर्ती तेजवंतसिंग संधु, तहसिलदार एम.एम.जोरवर, पंचायत समिती सभापती शैलेष इंगोले, ठाणेदार भरत कांबळे, गिलानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद, नगर परिषदेचे शिक्षण सभापती संदिप बिबेकार, पोलीस उपनिरिक्षक रमेश येडमे, अ‍ॅड निलेश चवरडोल, एस.पी.एम.र्इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक प्रा.एम.आर.शुक्ला, स्थानिक पत्रकार यांनी सदिच्छा भेट देऊन दै.सकाळच्या उपक्रमाचे कौतुक केले. 
या स्पर्धेमध्ये शि.प्र.मं.मुलांची शाळा, एस.पी.एम.इंग्लिश मिडीयम स्कुल, श्री समर्थ विद्यालय, शि.प्र.मं.कन्या शाळा, श्री गजानन महाराज इंग्लिश मिडीयम स्कुल, श्री समर्थ कर्णबधीर विद्यालय, नगर परिषद शाळा क्र.१, २, ३, ४, ५, नगर परिषद उर्दू हायस्कुल, या शाळांमधील विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी वेंâद्रप्रमुख म्हणुन येथिल प्रसिद्ध चित्रकार प्रमोद ठाकरे व सौ.उमा ठाकरे यांनी काम पाहिले. या स्पर्धेला माजी नगराध्यक्ष राम खांडरे, प्रियदर्शीनी मुलींच्या वस्तीगुहाचे प्रदिप वाकपैंजन, मिराताई वाकपैंजन, जितेंद्र सहारे, प्रशांत आडकिणे, मिलिंद लोहकरे, संतोष नगराळे, अमोल वारंजे, युधिष्ठीर राऊत, यांचेसह 
राजेश उदार, प्रदिप जाधव, राम बेजारपवार, आकाश राऊत, दिपक सपकाळ, संदिप दिडशे, एस.के.ताजने, हि.गं.येन्नरवार, डी.आर.राऊत, जी.एम.बंडीवार, अनिकेत निंबाळकर, यु.एच.मसराम, संचित राऊत, अभय र्इंगळे, आकाश राऊत, एस.व्ही राठोड, प्रशांत उगले, एस.डी.नगराळे, ए.एन.रामटेके, जी.जी.गिनगुले, कु.शा.मडावी, प्रशांत गवळी, विशाल साबापुरे, गितांजली राऊत, विशाल कदम, कु.सबिहा अरशिद, पी.जी.चौधरी, एम.एस.गिरी, प्रदिप भारती, अनिल मस्के, सुरेश राठोड, निखिल पवार, मनोज बुरांडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी, एस.पी.एम.इंग्लिश मिडीयम स्कुल, सिद्धार्थ वस्तीगुह यांनी सहकार्य केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सकाळचे घाटंजी तालुका बातमीदार अमोल राऊत, शहर बातमीदार पांडूरंग निवल, उज्वल सोनटक्के यांनी पुढाकार घेतला.
उमलत्या प्रतिभांना संधी देणारा उपक्रम : 
न्यायमुर्ती तेजवंतसिंग संधू
लहान मुले हि देशाचे भवितव्य आहेत. त्यांच्या कल्पनेतूनच उद्याच्या भारताची जडणघडण होणार आहे. त्यामुळे या बालकांच्या उमलत्या प्रतिभांना संधी देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याची प्रतिक्रीया घाटंजी न्यायालयाचे न्यायमुर्ती तेजवंतसिंग संधु यांनी दिली. विद्याथ्र्यांच्या कलागुणांना प्रोत्साहीत करण्यासाठी असे प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय श्री समर्थ कर्णबधीर विद्यालयातील अपंग विद्याथ्र्यांनी काढलेल्या चित्रांचे त्यांनी कौतुक केले. तसेच यावेळी अनेक विद्याथ्र्यांशी संवाद साधुन त्यांना प्रोत्साहन दिले.
स्पर्धेतील टिपलेले काही क्षण.....!
(छायाचित्र : अमोल वारंजे, मिलिंद लोहकरे, अमोल राऊत)