Pages

Tuesday 8 January 2013

रस्त्याच्या कडेला सावली देणा-या झाडांची बेसुमार कत्तल

सा.बां.विभागाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष

जंगलातील रस्त्यावरून जातांना आजुबाजूची झाडे वाहनधारकांना सावली देतात. बाभुळ, पळस व तत्सम झाडे निसर्गाचे संतुलन कायम ठेवण्यासाठीही उपयोगी आहेत. मात्र आता सागवान वृक्षांपाठोपाठ ईतर वृक्षांकडेही ठेकेदारांची नजर वळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या कडेवरील झाडांची बेसुमार कत्तल करण्याचे सत्र सध्या सुरू आहे. घाटंजी तालुक्यात सर्वत्र हा प्रकार दिसत आहे. घाटंजी यवतमाळ रस्त्यावरील झाडे तोडल्या जात असल्याने निसर्ग प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांनी याबाबत संबंधीतांना विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबतचे कंत्राट घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर परिसर सा.बां.विभागाच्या यवतमाळ उपविभागांतर्गत येतो. या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रांर्गत यापुर्वीही अनेकदा असे प्रकार घडल्याची माहिती आहे. जीर्ण झालेली व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी झाडेच तोडण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभाग देऊ शकते अशी माहिती सा.बां.विभागातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली. मात्र सध्या हिरवीकंच झाडे तोडण्याचे सत्र परिसरात सुरू असल्याने याला अटकाव कोण करणार असा प्रश्न निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी या प्रकाराची दखल घ्यावी अशी मागणी आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment