Pages

Saturday 17 November 2012

शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी घाटंजी तालुक्यातून प्रातिनिधीक प्रतिक्रीया !



आम्ही ‘पोरके’ झालोय !

बाळासाहेब समस्त शिवसैनिकांसाठी वडीलांसमान होते. त्यांच्या जाण्याने प्रत्येक शिवसैनिक पोरका झालाय. मात्र त्यांचे ज्वलंत विचार आम्हाला प्रत्येक क्षणी प्रेरणा देत राहिल. त्यांच्या विचारांशी ईमान राखत आम्ही अशीच वाटचाल करीत राहु. बाळासाहेबांच्या निधनाने देशाच्या राजकारणाची व वैचारीकतेची झालेली हानी कधीच भरून निघणार नाही.
भरत दलाल
शिवसेना तालुका प्रमुख, घाटंजी


बाळासाहेबांच्या विचारांनीच खुप काही शिकविले

बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्तीमत्व नव्हे तर एक झंजावात होते. त्यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरीत होऊन माझ्यासारख्या अनेक तरूणांनी त्या काळी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. केवळ बाळासाहेबांच्या तेजस्वी विचारांच्या बळावरच शिवसेनेने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. त्या विचारांमुळेच आज कोणापुढेही न झुकता भ्रष्ट व्यवस्थेशी लढा देता येतोय.
मधुकर निस्ताने
सामाजीक कार्यकर्ता, घाटंजी



एका युगप्रवर्तकाचा अंत

कोणतेही सत्ताकेंद्र नसतांना स्वत:भोवती राजकीय, सामाजीक व वैचारीक वलय निर्माण करणारे बाळासाहेब म्हणजे एक युग होते. त्यांचे जाणे म्हणजे एका युगाचा अंत आहे. त्यांचे विचार प्रखर होते. परिणामांची चिंता न करता ते आपले विचार प्रकट करायचे. बोललेल्या गोष्टीवर ठाम राहण्याचे सामथ्र्य खुप कमी राजकारण्यांमध्ये असते.
मोरेश्वर वातिले
सामाजीक कार्यकर्ता, घाटंजी

साभार :- देशोन्नती 


No comments:

Post a Comment