Pages

Friday 10 August 2012

पुरग्रस्त विद्यार्थ्यांना साहित्य संसदेतर्फे पोशाख वाटप


तालुक्यात आलेल्या महापुरामुळे उध्वस्त झालेल्या कोळी (बु), डांगरगाव, विरूळकवठा, कापसी कोपरी व माणुसधरी या गावातील सुमारे २७० शालेय विद्यार्थ्यांना फुले आंबेडकरी साहित्य संसदेतर्फे पोशाख वाटप करण्यात आले. बुद्ध धम्मात वर्षावासाच्या कालावधीत दान करणे महत्वाचे समजले जाते. त्यानुषंगाने पुरात सर्वस्व वाहुन गेलेल्या कुटूंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणीक महत्व लक्षात घेता विद्याथ्र्यांना पोशाखाचे वाटप करण्यात आले. पुज्य भन्ते विपश्यी पुज्य भन्ते धम्मसागर, आर्याजी बुद्धकन्या आर्याजी प्रजापती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  फुले  आंबेडकरी साहित्य संसदेचे जिल्हाध्यक्ष किशोर भगत होते.
यवतमाळ नगर परिषदेचे सदस्य टोनु उर्फ पंकज मेश्राम, नितिन मेश्राम, आनंद लोखंडे, तालुकाध्यक्ष सुनिल नगराळे, भगवान सरदार, देवकुमार शेंडे, प्रदिप गवळी आदी उपस्थित होते.
कोळी येथे सरपंच सुभद्रा मरापे, उपसरपंच चंद्रप्रकाश खरतडे, एस.एच.डोंगरे, पोलीस पाटील सुभाष डफडे, आनंद कोरवते, आनंद बावणे, गजानन बावणे, नारायण गिनगुले यांच्या उपस्थितीत गणवेश दान देण्यात आले.
डांगरगाव येथे ज्ञानेश्वर महल्ले, प्रभाकर भगत, मुख्याध्यापक ए.डी.राठोड, शिक्षक के.डी.मुनेश्वर, कवठा विरूळ येथे प्रभाकर धांदे, मुख्याध्यापक एस.एम.पुनसे, डी.एम.परतेती, ग्रामसेवक एम.व्ही.गाऊत्रे, कापसी कोपरी येथे उपसरपंच उत्तम बिबेकर, मुख्याध्यापक व्ही.एम.चिकराम, ए.एल. उईके, ग्रामसेवक जुडे, तर माणूसधरी येथे प्रविण बनसोड, जितेंद्र खरतडे, राजु खरतडे, शेख अयुब, मुख्याध्यापक व्ही.एस.तगलपल्लेवार, व्ही.एस.लोखंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन एम.एस.चांदेकर, आर.एस.ताटेवार, एस.पी.वेले, डी.एम.मोहुर्ले यानी तर आभार स्थानिक शिक्षकांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र देवतळे, अशोक तोडसाम, संजय गुल्हाणे, प्रतिक अडवलवार यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment