Pages

Thursday 26 January 2012

भयमुक्त निवडणुकांसाठी जनजागृती अभियान

वाढत्या तक्रारींमुळे आयोगाचे पाऊल
राष्ट्रीय मतदार दिनापासून सुरूवात
निवडणुकीत उमेदवारांकडून देण्यात येणा-या प्रलोभनांना बळी न पडता नि:पक्ष मतदान व्हावे यासाठी निवडणुक आयोग जनजागृती अभियान राबविणार आहे. २५ जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनापासुन एक आठवडाभर स्थानिक सामाजीक संघटनांच्या मदतीने मतदार जागृती अभियान राबविण्यात यावे असे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पैसे व दारूचा वापर होऊ नये, तसेच मतदारांमध्ये मतदानाच्या महत्वाची जाणीव निर्माण व्हावी हा या अभियानाचा उद्देश आहे. त्यासाठी राज्य निवडणुक आयोगाने मतदारांच्या जागृतीसाठी सीडी तयार केली आहे. ती स्थानिक केबल टि.व्ही.वर प्रसारीत करण्यात येणार आहे. शिवाय मतदारांना आवाहन करणारे फलक सुद्धा लावण्यात येतील. आगामी निवडणुकांमध्ये विवीध प्रलोभनांचा वापर करून सर्रासपणे मतदारांवर दबाव आणण्याचे प्रयत्न उमेदवार व राजकीय पक्षांकडून होत असल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुका भयमुक्त व स्वच्छ वातावरणात पार पाडण्याच्या दुष्टीने एक सकारात्मक संदेश जनतेत पोहचावा यासाठी आयोगाने हे पाऊल उचलल्याचे या आदेशात म्हटले आहे.
साभार :- देशोन्नती

No comments:

Post a Comment