Pages

Wednesday 2 November 2011

यवतमाळ जिल्ह्यात कापसावर आधारीत उद्योगांची उभारणी व्हावी

खासदार हंसराज अहिर यांचे प्रतिपादन
कापुस उत्पादनात अग्रगण्य असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कापसावर आधारीत उद्योगांची उभारणी व्हावी याकरीता कॉटनसेझ होणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन खासदार हंसराज अहिर यांनी केले.
घाटंजी येथे भा.ज.प. कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी आहे. मात्र त्यांना त्या तुलनेत मोबदला मिळत नाही. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. घाटंजी नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेना व मित्रपक्षांशी समन्वय राहीला तर एकत्र निवडणुक लढवु अन्यथा स्वतंत्र निवडणुक लढण्यास भाजप सक्षम आहे असा दावा त्यांनी केला.
घाटंजी नगर परिषद जुनी असुनही त्या तुलनेत प्रगतीच्या दृष्टीने बरीच मागे असल्याचे ते म्हणाले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीही पक्ष सज्ज असल्याचे त्यांनी सांगीतले. घाटंजी शहराच्या सौंदर्यीकरणासाठी उद्यानांची निर्मिती करण्यावर भर देणे गरजेचे असुन त्यासाठी आपण दहा लाख रूपयांचा निधी दिला व आणखी दहा लाख रूपये देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकार परिषदेला भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्ता कोंडेकर, शहराध्यक्ष राजु सुचक, मधुसूदन चोपडे, सतिष मलकापुरे, मुकुंद कदम, वासुदेव महल्ले, अरविंद बोरकर यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment