Pages

Friday 25 November 2011

घाटंजीत विकासाची गोळाबेरीज शून्य

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शहरामध्ये घाटंजीचा समावेश होतो. येथे निर्सगाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. मात्र या आडवळणावरच्या शहराला सौंदर्यांची विकासात्मक झालर लावणे गेल्या १५ वर्षात नगरपरिषदेतील सत्ताधार्‍यांना जमलेच नाही. चार प्रभाग असलेल्या छोट्याश्या शहरात समस्यांचे अनेक डोंगर आहेत. नगरपरिषद असून अनेक ठिकाणी प्राथमिक मुलभूत सुविधा पोहचल्या नाहीत. नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि हौसेगवसे नवसे यांची लगीनघाई सुरू झाली. नमस्कार चमत्काराला वेग आला. यात काही नवीन चेहरे आहेत तर काही जुने चेहरेही आहेत. अशांनी नगर विकासासाठी काय दिवे लावले आहे याची जंत्रीच मतदारांजवळ आहे. 
शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी प्रभाग एक ते चार मध्ये फेरफटका मारला असता तेथे विविध समस्यांचा दिसून आल्यात. प्रभाग एक मधील नेहरूनगर परिसरात अंतर्गत पक्के रोड नाही. नालीतील घाण पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे. घन कचरा टाकण्याची व्यवस्था नसल्याने ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग लागले आहेत. स्वच्छतेसाठी कोणतीची यंत्रणा कार्यतरत नसल्याचे स्पष्ष्टपणे जाणवते. साचलेला कचरा जागेवरच कुजून त्यांची दुर्गंधी सुटली आहे.पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमस्वरूपी आहे. नळांची जोडणी ही जुनी असल्याने पाणी पूरवठा बरोबर होत नाही तर काही भागात नळच नाही. वसहतीपासून वाहणार्‍या नदीवर संरक्षण भिंत नसल्याने दरवर्षी पुराचे पाणी अनेकांच्या घरात घुसते. दुर्गामाता वॉर्डातील रस्त्यावर अनेकवर्षांपासून डांबरीकरणच झाले नाही. मात्र परिसरातील एका पदाधिकार्‍याने स्वत:सह नातेवाईकांच्या घरापर्यंत डांबरीकरण करून घेतले आहे. हा अन्याय उघड्या डोळ्य़ांनी नागरिकांनी पाहिला आहे.सांडपाण्याच्या नाल्यासुध्दा अर्धवट असल्याने सांडपाणी रस्त्यावरच साचत आहे.डबके साचले असून त्यात डासांची उत्पत्ती होत आहे. अर्धवट नाल्याच्या सफाईची तसदीही घेतली जात नाही. त्याची सफाई नागरिकानाच करावी लागते. दुर्गा माता वॉर्डपरिसरातील नाल्यावरची संरक्षण भिंतसुध्दा अर्धवटच आहे. पावसाळ्य़ात याही भागाला पूराच्या पाण्याचा तडाखा बसतो.

धर्मशाळा वॉर्डमध्येही अर्धवट कच्च्या नाल्यातील पाणी रस्त्यावर साचून गटारे तयार झाली आहे. येथील एका सार्वजनिक शौचालयास आडवे टीनपत्रे लावून केला. त्यामुळे हागणदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जेसीस कॉलनीमध्येही अंतर्गत रस्त्याची समस्या आहे. नाल्या व सांडपाण्याची व्यवस्था नाही. अंबादेवी वॉर्डात तर अंतर्गत रस्ते नाही आणि वीजही नाही. कसेबसे येथील १0 लोकांनी मिळून पैसे भरून घरी वीज घेतली आहे. येथे आता एक रोड होत आहे पण तोही नागरिकांच्या पाठपुराव्यानेच होत आहे. आंबेडकर वॉर्ड प्रभाग चारमध्ये येत असून तो नदीकाठी आहे. तेथे संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे. आनंदनगरमध्ये चालता येण्याजोगे रस्ते नाही, नाल्या नाही, सांडपाणी रस्त्यावरून वाहते, काही ठिकाणी ही घरात शिरते, परिसराची साफसफाई नागरिकच करतात. येथील पथदिवे तक्रार दिल्यानंतर १५ दिवस बंद राहतात. अनेकदा चालूच होत नाही. येथे डुकरांचा मुक्तसंचार आहे. डूकरांच्या हल्ल्यात अनेक लहान मुले जखमी झाली आहेत.डुकरांच्या भितीने मुलांना अपल्या खेळास मुकावे लागत आहे. अशाही स्थिती नगरपरिषद प्रशासनाने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीच मोहिम हाती घेतली नाही.


 शहरातील वसंतनगरमध्येही रोड नाही, नाल्या नाही, वीजही नाही. त्यामुळे येथील ५0-६0 महिलांनी तहसील व नगरपरिषदेवर तीन-चारवेळा मोर्चा नेला. पण समस्या सुटल्या नाहीत. प्रभाग दोनमध्ये येणार्‍या घाटी भागात हागणदारीची मोठी समस्या आहे. हागणदारी मुक्तीसाठी शासनाने अनेक कार्यक्रम राबविले, पथनाट्ये, नाटके केली पण परिणाम शून्यच राहिला. नागरिकांनीही बोध घेतला नाही. लहान पूल ते पारवा रोडवर लोकांनी उघड्यावर बसू नये म्हणून एक मोठी भिंत बांधून आडोसा केला आहे. या आडोशामागे हागणदारी होत आहे. त्या भिंतीऐवजी तिथेच दोन-चार शौचालय बांधले असते तर ते कमी खर्चाचे झाले असते., शिवाय हागदारीचा प्रश्नही निकाली निघाला असता.परंतु सम्येचे कायमस्वरूपी निराकरण करायचेचं नाही, असा प्रघात आहे. स्मशानभूमीवर शेड असून उत्तरक्रियेसाठी कोणतीच व्यवस्था नाही.
कधी थांबणार पुराचे पाणी?
समस्यांचा खच असल्याने महत्वाची कोणती असा भेद करता येत नाही. आजही पावसाळ्य़ात लगतच्या नदीनाल्यांचे पाणी वसाहतीत शिरते त्यासोबतच घाणही वाहून येते. अर्धवट नाल्या व पूरसंरक्षक भिंती, कच्चे रस्ते, रस्त्यावर काळोख, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. नगरपरिषद असूनसुध्दा अंत्यविधीसाठी सुव्यवस्थित स्मशानभूमी नाही. साधे दहनशेड उभारणेही आजपर्यंत जमलेच नाही.
शौचालयाची दुरवस्था
दुर्गामाता वॉर्डातील सार्वजनिक शौचालयाची स्थिती अतिशय बिकट आहे.शौचालयाला दारेच नसल्याने तिथे डुकरांनी डेरा घातला आहे. नागरी वसहातीत बंद पडलेल्या शौचालयाच्या घाणीची दुर्गंधी पसरली आहे. त्यातील घाण तीनही बाजूंनी असलेल्या नालीत साचली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना घरात राहणेही नकोशे झाले आहे. नगरपरिषदेला याचे काही देणे-घेणे नाही. पावसाळ्यात तर येथील स्थिती अतिशय भयावह होते. तसेच हागणदरीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे.

सौंदर्यीकरणाचा विसर
केवळ राजकारण आणि राजकारण यातच गुरफटून असलेल्या आत्तापर्यंतच्या सर्वच नगरसेवकांना शहराच्या सौंदर्यीकरणाचा विसर पडला आहे. शहर हिरवेगार दिसावे, सुंदर असावे हे त्यांना कळलेच नाही. एक बगीचा होता तो नगरपरिषदेने खासगी संस्थेला देऊन उजाड केला. दुसरे उद्यान दुर्लक्षित आहे. तर घाटी रोडवर लोकसहभागातून काही युवकांनी लावलेल्या झाडांना पाणी टाकणेही नगरपरिषदेला जमले नाही. मुलांना बागडण्यासाठी शहरात एकही बगीचा नाही.
 
उघड्यावर कचर्‍याचे ढिग
शहरातील कचरा वसंतनगरकडे येणार्‍या मुख्य रस्त्याच्याकडेला आणून टाकला जात आहे. पालिकेने वसंतनगर परिसरात अनधिकृत कचरा डेपोच उघडला असल्याचे यावरून दिसते. नगरपरिषदेच्या कामात भर टाकण्याचे काम डुकरांकडून केले जाते. हा कचरा इतरत्र पसरवितात. शिवाय हवेबरोबर हा कचरा रस्त्यावर येऊन घाणीचे कण ये-जा करणार्‍याच्या अंगावर उडतात. यामुळे रस्त्यावरून पायदळ जाणेही दुष्कर झाले असल्याचे दिसून येते.
साभार-लोकमत
विठ्ठल कांबळे
9421774062

No comments:

Post a Comment