Pages

Wednesday 16 November 2011

घाटंजीकरांच्या भावनांचा ‘भाव’ लावणाऱ्या ‘त्या’ उमेदवाराविरोधात समाजमन एकवटणार

गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात नगर परिषदेच्या माध्यमातुन प्रत्येक कामात जनतेला वेठीस धरणा-या हुकुमशाही प्रवृत्तीच्या त्या उमेदवाराला न.प.मधुन हद्दपार करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकातुन प्रयत्न होणार असल्याचे चित्र सध्या घाटंजी शहरात आहे. त्या विद्यमान नगर सेवकाने केवळ घाटंजी नगर परिषदेतच धिंगाणा घातलेला नसुन काही वर्षांपुर्वी घाटंजी तालुका ज्या भावनेने एकत्र झाला होता त्या भावनेचाच ‘भाव’ या महाभागाने लावला होता. येथिल एका शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाने धार्मिक द्वेषभावनेतुन विद्यार्थ्यांसमोर वक्तव्य केले होते. त्यानंतर काही संघटना व विद्यार्थ्यांचे एक अभुतपुर्व आंदोलन घाटंजी शहरात झाले होते. तब्बल एक महिना या घटनेमुळे महाविद्यालय बंद होते. सदर प्राध्यापकावर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये अवघे घाटंजी शहर सहभागी झाले होते. शहराच्या ईतिहासातील ते अद्वितीय जन आंदोलन ठरले. त्यावेळी हिंदुत्ववादी पक्षाचा नेता या नात्याने सदर नगरसेवकाकडे या आंदोलनाचे नेतृत्व होते. मात्र आंदोलन ऐन भरात असतांना त्याने चक्क जनतेच्या भावनांची किंमत लावुन आंदोलनाची धार कमी केली. त्या प्राध्यापकाकडुन घसघशीत रक्कम खिशात पडताच या महाशयांचा तोराच बदलला. त्यावेळी या ‘खपलेल्या’  नेत्याची खमंग चर्चा घाटंजी शहरात झाली होती.
एकंदरीतच जनतेच्या उठावाचे भांडवलही स्वत:चा स्वार्थ साधुन घेण्यासाठी करणा-या उपटसुंभ नेत्याचा अनुभव गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात जनतेने घेतला आहे. त्यामुळे केवळ पोकळ दहशतीचा वापर करून आपली पोळी शेकुन घेणा-या या नगरसेवकाला यावेळी नगरपरिषदेतुन हद्दपार करण्याचा चंग समाजातील काही घटकांनी घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने युवा वर्गाचा समावेश आहे. या उमेदवाराला इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने जवळ करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा नकारात्मक प्रभाव त्यांचेवरही पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
साभार:-देशोन्नती 

No comments:

Post a Comment