Pages

Wednesday 7 September 2011

आरोपीला ‘सॉफ्टकॉर्नर' पोलीस कॉन्स्टेबलवर ‘दबाव’


घाटंजीच्या ठाणेदाराचा अजब कारभार
पोलीस कर्मचारी मारहाण प्रकरण

पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन पोलीस कॉन्स्टेबल उमेश चंदन यांना बेदम मारहाण करणारा आरोपी प्रविण उर्फ भारी पांडुरंग खैरे (वय ४०) याचेवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने घाटंजी पोलीसांचा अनियंत्रीत कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाहतुक पोलीसाने खैरे याच्या पुतण्याची मोटरसायकल चलान केली. यामुळे चिडलेल्या खैरेने पोलीस कर्मचारी उमेश चंदन यांना पोलीस स्टेशनच्या आवारात अडवुन सुरूवातीला हुज्जत घातली व त्यानंतर अर्वाच्य शिविगाळ करून बेदम मारहाण केली. ईतर पोलीस कर्मचा-यांनी त्यांना सोडविल्याने हे प्रकरण थोडक्यात निभावले. उमेश चंदन यांनी प्रविण खैरे व त्याचा साथिदार अनिल खैरे यांचे विरोधात तक्रार केली. मात्र सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांनी ठाणेदार बाबुराव खंदारे यांचे आदेशावरून या आरोपी विरोधात गुन्हा दाखल न करता प्रकरण ‘चौकशीत' ठेवले. विषेश उल्लेखनिय म्हणजे गुरनूले यांनी सदर आरोपीस पोलीस कर्मचा-या विरोधात तक्रार करण्यास प्रोत्साहीत करून जातीवाचक शिविगाळ केल्याची तक्रार नोंदवुन घेतली असेही चर्चिल्या जात आहे. या घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी गेडाम, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनाही कळविण्यात आली. मात्र स्थानिक पोलीस अधिका-यांनी चंदन यांनाच तांत्रिक दुष्ट्या या प्रकरणात अडकवुन वरिष्ठांचीही दिशाभुल केल्याचे पोलीस वर्तुळात बोलल्या जात आहे. सदर आरोपी अवैध व्यवसायाशी संबंधीत असुन त्याचेवर अनेक गंभिर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. चोरांबा परिसरात मोठ्या प्रमाणावर कोंबडबाजार चालतो. त्यातुन मोठ्या प्रमाणावर मलिदा मिळत असल्याने ठाणेदार खंदारे व स.पो.नि. गुरनूले यांनी सदर आरोपी विरोधात विषेश सहानुभूती दाखविल्याचे समजते. घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये चालणा-या या मनमानी कारभारावर उपविभागीय अधिकारी गेडाम यांचे नियंत्रण नसल्याचे सिद्ध होत आहे. पोलीस कर्मचा-याला मारहाण झाल्याच्या घटनेबाबत पोलीस स्टेशनच्या आवारात कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. बराच वेळ स्टेशन डायरी दडवुन ठेवण्यात आली होती. प्रस्तुत प्रतिनिधीने या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी संपर्वâ केला असता राजेंद्र वाढीवा या कर्मचा-याने माहिती देण्यास नकार दिला.
आज दुपारी वृत्तपत्र प्रतिनिधी या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता स्टेशन डायरी अमंलदार रफिक शेख (पापामियाँ) यांना ठाणेदारांनी तातडीने आपल्या निवासस्थानी बोलाविले. त्यानंतर शेख यांनी याबाबत माहिती देण्यास स्पष्ट नकार देऊन प्रकरणाचा तपास साहेबांकडे असल्याचे सांगितले. एकंदरीतच या सर्व घटनाक्रमावरून ठाणेदारांची भुमिका संशयास्पद असल्याचे दिसुन येत आहे.
या घटनेमुळे पोलीस कर्मचा-यांचे मनोधैर्य खचले असुन पोलीसच असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस स्टेशनच्या आवारात जर पोलीस कर्मचा-याला मारहाण होत असेल तर गुन्हेगारांवर यंत्रणेचा काय वचक असेल हे लक्षात येते. घाटंजी पोलीस स्टेशन गेल्या काही महिन्यांपासुन चर्चेत आले असुन येथिल अधिकारी आता वरिष्ठानांही जुमानत नसल्याचे चित्र आहे. ठाणेदार खंदारे व स.पो.नि. गुरनूले यांची आरोपींच्या बाजुनेच सहानुभूती जास्त असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये दिसुन आले आहे. त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तींशी असलेला ‘लळा' असाच कायम राहिला तर या भागात कायदा व सुव्यवस्थेचा गंभिर प्रश्न निर्माण होण्याची स्पष्ट चिन्हे दिसुन येत आहे.

साभार :- दै. देशोन्नती

No comments:

Post a Comment